Wednesday, October 20, 2010

लालू द सेकंड

 तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर जेव्हा एका नातवालामहाराष्ट्रार्पण’ केलं जात होतं तेव्हा इकडे पाटण्याच्या गांधी मैदानावर एका पुत्रालाबिहारार्पण’ केलं जात होतं. मुंबईतठाकरे’ तर पाटण्यातयादव’ आपल्या राजकारणाची बोथट झालेली तलवार आपापल्या पुढच्या पिढ्यांना धार लावायला देत होते. निवडणुकांच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यादवांनी आपल्या 22 वर्षाच्या मुलाला, तेजस्वी यादवला, राजकारणात लाँच केलंय



तेजस्वी निवडणूक लढवत नाहीये, (तसे आपल्याकडे ठाकरेही निवडणूक लढवत नाहीत) पण बिहारभर सभा घेऊन वडिलांइतकाच इकडच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर रोज झळकतोय. बऱ्यापैकी लालू स्टाईलनं भाषण करतांनाची त्याची मुद्रा पाहिल्यावर वाटलं की पक्कं गंगाकाठचं यादवांचंच पाणी असणार, पण जेव्हा पाटण्याच्यासर्क्युलर रोड’वरच्या लालूंच्या घरी तेजस्वीशी गप्पा मारायला गेलो तेव्हा वाटलं की बॅट घेऊन दिवसभर नेट प्रॅक्टिस करणारा हा मुलगा कसलीयादवी’ तलवार परजणार?

राजकारण्यांची, मंत्र्यांची राजकारणात आलेली तरूण मुलं म्हटलं की एक ठराविक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते महाराष्ट्रात काय आणि बिहारात काय, फ़ार वेगळं नाही. पण तो मुजोरपणा तेजस्वीमध्ये निदान त्या अर्ध्या तासात तरी जाणवला नाही. पुण्याहून आलोय म्हटल्यावर तर तो खुललाच.


"हमारे तो बहुत सारे दोस्त है वहां.... अक्सर आते है हम पुणे... वो जो सेनापती बापट रोड परमेनलँड चायना’ है ना, वहां रहता हमारा एक दोस्त शिवाजी मुंडे.... उसीके पास आते है..." या तेजस्वीला तर पुण्याचे रस्ते आणि हॉटेल्स पाठ होती. कसं काय?


"अच्छा... सुना है की आपकी एक बहन पुणे में थी पढाई के लिये... तो उस वजह से आना जाना रहा होगा..." मी म्हटलं.
"अरे नही नही... दोस्त जो इतने वहां... वह कोरेगांव पार्क मेंहार्ड रॉक्स’ तो हमारी सबसे पसंदीदा जगह. ’जर्मन बेकरी’भी हमेशा जाया करते थे... मॅचेस खेलने के लिये अक्सर आते है वहां..." तेजस्वीचं स्पष्टीकरण.


तर पुण्याशी सलगी बाळगून असलेला तिथल्या हॉटेल आणि रस्त्यांची माहिती असलेला हा लालू-राबडीपुत्र क्रिकेटर आहे. तो दिल्लीच्या रणजी संघातून खेळतो आणि आय पी एल मध्येहीडेल्ही डेअरडेव्हिल्स’ कडून खेळतो. मधल्या फळीतला बॅट्समन आणि उपयुक्त ऑफ स्पिनर. मॅच खेळायला कायम पुण्यात येणं जाणं. पण हे क्रिकेट सोडून राजकारणाचं खूळ कुठून शिरलं याच्या डोक्यात? वडीलांनी ओढलं की आईनं?


"अरे भाई, क्रिकेट इस स्टील माय फ़र्स्ट लव्ह अँड माय फ्यूचर... लेकिन राजनीति तो बचपन से घर में ही देखता आया हूं... तो मैने खुद ही कहा की मुझे प्रचार में आना चाहिये. पॉलिटिक्स में गया हूं लेकिन चुनाव तो नही लड रहा हूं..." तेजस्वीचं उत्तर तत्पर होतं.


याचं आत्तापर्यंतचं सारं आयुष्य दिल्लीत गेलं, शिक्षणही काही फ़ार नाही, १२वी पर्यंतच. क्रिकेटच फक्त डोक्यात होतं म्हणूनच शिक्षण सोडलं. अर्थात ते याला सहज शक्यही होतं. पण आता करस्पाँडन्स कोर्स करून ग्रॅज्युएशन पूर्ण करणार म्हणतोय आणि राजकारणाची तयारी म्हणून बिहारमध्ये येणंही वाढलंय. आई-वडील मुख्यंमंत्री असले की राजकारणात उतरणंही सोपं आणि अटळ असतं, नाही?


"वह तो है... लेकिन सिर्फ़ एंट्री आसान है.... अगर काम नहीं करूंगा और उसमे कंटिन्यूटी नही होगी तो कौन मुझे अपनाएगा? यह जिम्मेदारी बडी है..." राहुल गांधींपासून प्रणिती शिंदे-अमित देशमुखांपर्यंत सगळ्यांनी देऊन देऊन गुळगुळीत केलेलं उत्तर तेजस्वीही देऊ शकतो.


राजद’चा स्टार प्रचारक आहे तेजस्वी. जशी लालूंना पहायला प्रचंड गर्दी होते तशी तेजस्वीला पहायलाही होते. आणि तोही भोजपुरी मिश्रित बिहारी ढंगात अगदी लालू स्टाईलनेच बोलायचा प्रयत्न करतो. पण राबडींचंराजद’चं सरकार तर पाच वर्षांपूर्वी लोकांनी उलथून फ़ेकलं होतं. सध्याच्या नीतिश सरकार बद्दल ते खूष आहेत. मग तेजस्वी बिहारी जनतेसमोर कोणते प्रश्न घेऊन जातोय?

पण तेजस्वीचं लाँचिंग जरा घाईघाईतच झालंय. कारण यावेळी बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी उतरतायत. त्यांच्या सभांना गर्दीही होतेय. शिवाय इथल्या लोकांना आता लालूपेक्षा नितीश कुमार यांचं सरकार जवळचं वाटू लागलंय, या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी लालूंनी तेजस्वीला लाँच केलंय. राहुलच्या मागे जाणाऱ्या युवावर्गावर त्यांनी तेजस्वीचा उतारा केलाय.


"हम तो अपील कर रहै है यहां के यूथ को... क्या मिला उनको पिछले पांच साल में? रोजगार नही है प्रदेश छोडना पडता है... ना तो शिक्षा का प्रबंध यहा पर है, ना तो यहा इंडस्ट्रीज आती है... अच्छे अस्पतालों में इलाज करवाना हो तो बिहार से बाहर जाना पडता है... स्पोर्ट्स के लिये तो यहां पर कुछ नही किया जाता...." तेजस्वीची सरकारविरोधातली लिस्ट तयार आहे...


पण मग १५ वर्षं होतं तुमच्या पक्षाचं सरकार का काहीच केलं गेलं नाही तुझ्या मुख्यमंत्री असलेल्या आईवडीलांकडून? तुमचं राज्य तरजंगलराज’ म्हणवलं गेलं, त्याचं काय?अरे वह तो सारा मीडिया का एजेंडा था और है... हमारे समय कोई अपहरण का मामला होता था, तो मीडिया बवाल खडा कर देता था... आज मे अपहरण नही होते क्यां? लेकिन खबरे नही आती... हमारे वक्त नक्सलाईट कही जाने वाली सिर्फ़ पांच जगह थी, अब वह बढकर २६ हो गई है... उसके उपर कोई ध्यान क्यों नही देता?" तेजस्वी कडाडून विरोध करतो.


पण सारे इलेक्शन सर्व्हे तर म्हणताहेत की नीतिश कुमारांची सत्ता सहज परत येणार?सब मॅनिप्युलेशन है... सारे सर्व्हे गलत है" या कोणाच्याहीठरलेल्या’ उत्तरात आत्मविश्वास कधीच नसतो. फक्त निकालाची वाट पहायची असते.


राज ठाकरे आणि त्यांच्याभैय्याविरोधी’ आंदोलनाचा विषय तर येणारच. हाणामारी चूक पण स्थलांतराचा मुद्दा अतिमहत्वाचा नव्हे काय?


"ये देखीये, की हम पहले भी कह चुके है की प्रदेश के युवक को यही पर रोजगार मिलना चाहिये... लेकीन हम काम करने के लिए देश मे कही पर भी जा सकते है... क्या उसके लिए पासपोर्ट या लायसन्स लगेगा? राज ठाकरे ये सिर्फ़ पब्लिसिटी के लिए कर रहै है, उन पर ध्यान देना ही बेहतर रहेगा.." इति तेजस्वी.


सगळी उत्तरं जरीपार्टी’लाईनवरची असली, तरी इथे कायम साध्या उमेदवारांमध्येही बोलतांना एक मग्रूरी असते ती मात्र बिहारमध्ये लालूपुत्र असून तेजस्वीच्या बोलण्यात कुठेही जाणवत नाही. हे पढवल्यासारखं बोलणं की हा असाच आहे? तो असाच शांत आहे की हे बेमालूमपणे वठवलेलं नाटक आहे म्हणून लालूंसारखाच मुरब्बी राजकारणी होण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत? त्याला खरंच राजकारणात शिरायचंय की वडिलांच्या गरजेपोटी तो कंडिशन नसलेल्या पिच वर बॅटिंग करायला उतरलाय? तेजस्वीलाच काय पण कोणाही मुलाला, मुलीला, पुतण्याला राजकीय वारसदारी आनंदाने स्वीकाराविशी वाटते की पर्यायच नसतो?


या सगळ्याची उत्तरं काय असू शकतील याचा विचार करत असतांनाच (निवडणूक निकालाआधीच) तेजस्वी मिठाई मागवतो, तोंड गोड करा म्हणतो, आणि थांबलात इथे तर प्रचारात भेटू असं म्हणून आत निघून जातो.

---------------------------------




"
"


"


"


"


"

Tuesday, October 19, 2010

बिहार, भुजबळ आणि ठाकरे

अगदी पुण्या-मुंबईच्या पत्रकार परिषदेला जशी गर्दी असेल तशी पत्रकारांची, कॆमे-याची आणि बूम्सची गर्दी पाटण्याच्या पटेल मार्गावरील राष्ट्रवादीच्या बिहार प्रदेश कार्यालयात असते.


आणि कॆमे-याच्या मागून मोठ्याने प्रश्न येतो.

"लेकिन ये बताईये भुजबल साब, वहां आपके के राज ठाकरे तो बिहारी मजदूरोंकी पिटाई कर रहे है...तो आप किस आधार पर यहां वोट मांगने आए है?"


छगन भुजबळ मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या नात्यानं नेहमीचं ठरलेलं उतर द्यायला तयार होतात. ऎसा नही है जैसा आप सोच रहे हो...महाराष्ट्र मे काम कर रहे बिहार के लोग सुरक्षित है...सरकार ने उनकी सुरक्षा की जिम्मेदारी उठायी है..."..


तेवढ्यात अजून एक प्रश्न. एका महिला पत्रकाराचा.


"अच्छा वह छोड दिजीये... बाल ठाकरे ने कल मुंबई मे अपने पोते को राजनीति में लॊंच किया...आपका क्या कहना है?


"मेरा कहना?" भुजबळ अचंबित.


"हां. हां. राजनीति मे आये परिवारवाद पर आपकी राय क्या है? ये ठाकरे का अब जो चल रहा है ना..."

"अब उस पर मेरी राय क्या होगी? वह उनका परिवार जाने...बिहार चुनाव के बारे मे हम यहां पर बात कर रहे है नां?" भुजबळांनी प्रश्न टोलवलाय पण वैताग मात्र कायम आहे. ठाकरे बिहार मध्ये सुद्धा काही पाठ सोडत नाहीत.


त्यांचा हा वैताग संध्याकाळीही कायम राहतो जेव्हा बिहार मध्ये आलेले मराठी पत्रकार त्यांना याबाबत विचारतात. राज ठाकरेंच्या भैय्या विरोधीआंदोलनानंतर त्यांना बिहारात कायम हा प्रश्न विचारला जातोय.


"ज्यावेळेस आपल्याकडे पार अराजक माजलंय असं चित्र रंगवलं जात होतं तेव्हाही मला सतत विचारलं जात होतं इकडून. बिहारच्या पंचवीस एक पत्रकारांना महाराष्ट्रात बोलावून मी खरं चित्र दाखवलं. म्हटलं, बघा, आहे की नाही सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी." भुजबळ सांगतात.


अर्थात, त्यांना विचारली जाणारी ही ठाकरे प्रश्नावलीकाही संपत नाही. त्यात यंदाच्या निवडणूकांमध्ये राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे पुन्हा तापलेला बिहारमधून होणा-या स्थलांतराचा मुद्दा इथे सत्ताधारी आणि विरोधक, दोघांच्याही अजेंड्यावर आहे.


महाराष्ट्रातून बिहार मध्ये आलेले भुजबळ हे एकमेव स्टार प्रचारक आहेत. ’राष्ट्रवादीची नव्हे तर त्यांच्या महात्मा फ़ुले समता परिषदेची मोठी ओळख इकडे आहे. त्यानिमित्ताने जाणे येणे असल्याने, सभा होत असल्याने त्यांचा चेहरा इथे परिचित आहे. त्यामुळे दरभंगा-पूर्णिया हा शरद पवारांचा दौरा रद्द झाल्यावर राष्ट्रवादीकडे भुजबळांशिवाय दुसरं उत्तर नसतं.


अर्थात २४३ पैकी १७० जागा बिहारमध्ये स्वबळावर लढणा-या राष्ट्रवादीचं उपद्रवमूल्य नक्की किती हा वादाचा विषय आहे. एक आमदार होता त्यांचा, आता तोही मूळ पक्षात, म्हणजे कॊंग्रेसमध्ये, परत गेला. एकमेकांची मतं खाण्यासाठी इतक्या जागा लढवायची फ़ूस राष्ट्रवादीला कॊंग्रेसनं लावली की भाजपाने हा चर्चेचा विषय. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे तारिक अन्वर हेच बिहारचं राष्ट्रवादीचं एकमेव नेतृत्व. त्यामुळे जेव्हा बिहारचे पत्रकार भुजबळांना पत्रकार परिषदेत अन्वरांना केंद्रात एखादं मंत्रिपद देणार का असं विचारतात तेव्हा भुजबळांना ठाकरे प्रश्नावलीसोपी वाटते.
-------------------------------------

"

"

"

"

"
"

"